दिल्लीत नऊ बांगलादेशी नागरिकांना अटक   

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी हरयानाच्या मेवात येथील एका वीटभट्टीवर काम करणार्‍या नऊ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. हे सर्वजण एकाच कुटुंबातील असून, भारतात बेकायदा प्रवेश केल्यानंतर अटकेच्या भीतीने ते फरार झाले होते. 
 
पोलिसांनी २३ मे रोजी वझीरपूरमधील जे. जे. कॉलनीमध्ये पाळत ठेऊन एका व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीनंतर पोलिसांनी त्याच कुटुंबातील एका नवजात बाळासह आठ इतर बांगलादेशी नागरिकांना उत्तर-पश्चिम दिल्लीतील भारत नगर भागातून अटक केली. ते वैध कागदपत्रांशिवाय भारतात राहत होते.  त्याच्याकडून एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे. त्यांनी पश्चिम बंगालमधील कूचबिहार जिल्ह्यातील भारत-बांगलादेश सीमेवरून एका एजंटमार्फत बेकायदा देशात प्रवेश केला होता. सर्वांना हद्दपारीच्या प्रक्रियेसाठी परदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालयाकडे सोपवण्यात आले आहे.

Related Articles